जयसिंगपुर : जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जीवन
प्रकाश पब्लिक स्कूल जयसिंगपुर येथे महात्मा जोतीराव फुलेंना त्रिवार अभिवादन
देण्यात आले.
1848 साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील
शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे
ज्योतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात. असे जीवन प्रकाश
संस्थेचे सेक्रेटरी प्रिन्सीपल अभिता कोठावळे विद्यार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या.
यावेळी अध्यापिका प्रज्ञा कुरणे, अस्मा बागवान यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थित संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. प्रकाश दिपंकर, अध्यापिका चाऊस, प्रज्ञा कुरणे, अस्मा बागवान, रेणुका जंबगी शिक्षकेत्तर कर्मचारी
विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.